बुधवार, 5 नवंबर 2014

माळीण

चार दिवस आधी ….
केला होता ज्याचा धावा
बेताल मुजोर … पाऊस
मग असा का बरसावा … ?

ये रे, ये रे म्हणत
घातलं होतं ज्याला साकडं …
भिजूनही गेली आता
सारी सरपणाची लाकडं …

डोंगरदऱ्यापाशी दूर
माळीण गाव होत जिथे ….
विरून गेलं सारं आता
अस्तित्व दिसेना कुठे …

निद्रिस्त शांत, गाव सारं
अन करावा पावसाने कहर 
क्षणात बेचिराख सारं
उध्वस्त सारे घर …

झालं न आता समाधान
पुरती भागवलीस न हौस …
तू समोर असूनही
आता फक्त अश्रुंचाच पाऊस …

राख आता उरली फक्त
अन अंधार भरदिवसा …
झालं असेल झोडपून तुझं …
तर …….
दूर कुठे निघून जा, तू पावसा 




..… निघून जा, तू पावसा .. !!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें