कधी मला वाटतं स्वच्छंद पाखरू मी व्हावं,
पंख ते पसरुनी उंच गगनात झेपावं...
कुण्या गावच्या दूर नदीकाठी फिरावं
अशा ठिकाणी जिथं कुणी कुणी नसावं...
कधी मला वाटे लहानसं लेकरू मी व्हावं,
घट्ट बिलगुनी आईच्या कुशीत मी निजावं...
कधी मला वाटे गायीचं वासरू मी व्हावं,
अपार ओढीने तिच्या अवतीभवती घुटमळावं...
कधी मला वाटे कवीचे काव्य सुंदर व्हावं
मनीच्या भावना वेचून छान शब्दात मला गुंफाव...
कधी मला वाटे नाविकाची नौका मी व्हावं,
वाऱ्याच्या दिशेने स्वतः बेफाम भिरकावं...
मन माझं पाखरू उनाड, विहरते उंच आकाशी
जगणं माझं धुंद स्वच्छंदी, गीत सजवून माझ्या सुरांशी ... !!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें