चार दिवस आधी ….
केला होता ज्याचा धावा
बेताल मुजोर … पाऊस
मग असा का बरसावा … ?
ये रे, ये रे म्हणत
घातलं होतं ज्याला साकडं …
भिजूनही गेली आता
सारी सरपणाची लाकडं …
डोंगरदऱ्यापाशी दूर
माळीण गाव होत जिथे ….
विरून गेलं सारं आता
अस्तित्व दिसेना कुठे …
निद्रिस्त शांत, गाव सारं
अन करावा पावसाने कहर
क्षणात बेचिराख सारं
उध्वस्त सारे घर …
झालं न आता समाधान
पुरती भागवलीस न हौस …
तू समोर असूनही
आता फक्त अश्रुंचाच पाऊस …
राख आता उरली फक्त
अन अंधार भरदिवसा …
झालं असेल झोडपून तुझं …
तर …….
दूर कुठे निघून जा, तू पावसा
…
…
..… निघून जा, तू पावसा .. !!
बुधवार, 5 नवंबर 2014
माळीण
नाती ...
जपली या जीवनी
मी कैक नाती जरी …काही सपशेल खोटीकाही वरवर खरी …खोट्या अशा हास्यामागेभाव होते बनावटी ...समोर होई उदोउदोअन द्वेष आपल्यापाठी …तस ही नातं टिकवायलाहल्ली कुणाला असतो वेळ ...मृगजळामागे धावूनरंगे भातुकलीचा खेळ ...काही नाती असतातफक्त आठवणींमधे ...क्लिष्ट वाटे वरूनतरी आतून फार साधे …काही नाती मात्रक्षणभंगुर असतात ...विरून गेली तरीआठवणींमध्ये दिसतात …आठवणीच मळभ कधीअचानक दाटून येतं ...दुरावलेल्या नात्यांनाअवचित भेटून येतं ...हिरमुसलं मन कधीनात्यातला आधार शोधतंसाथ मिळेल सदाअसं कुणी साथीदार बघतं …मिळाला असा सोबती कीनात्यातली गंमत कळतेअर्थ नात्याचा तेव्हाचं कळतोजेव्हा छान रेशीमगाठ जुळते …स्वच्छंद होऊन जगतानाकसं भान हरपून जावं..कुणाच्या डोळ्यात हरवून जाऊइतकं आपलंसं कुणी हवं ... ….इतकं आपलंसं कुणी हवं … !!
माझा भारत देश ...
शुरवीरांची भूमी ही
ताठ अमुचा कणाझुकणार नाही कदापिहाच लढवय्या बाणाघडवले स्वराज्य स्वः हाताअशी अमुची भारतमातासंचारते वीज रक्तातस्मरूनी अमुची विजयगाथासुजलाम सुफलाम धराअसे ही शेतकऱ्यांची भूमीसर्व धर्म समभाव असेअशी ओळख अमुची जुनीकरी असाध्य रोगनिवारणअशी आयुर्वेदाची महतीमहिमा समजावुनी वेदाचापरिचय करुनिया अवघ्या जगतीयोगाचे महत्व समजले जेव्हापाश्चात्यांनीही केले अनुकरणथोर महिमा ऋषीमुनींचाजोपासावा करुनिया स्मरणशिलेदार आम्ही देशाचेआहोत उद्याचे आधारस्तंभवसा घेउनि सुराज्याचाहाती हात घेउनिया संगगाऊनी तुझी महती अखंडपर्वणीच तशी आज विशेषनतमस्तक सदा तुझ्या चरणीअसा भारत माझा देश .... …...माझा भारत देश .... !!
नात विश्वासाचं ..
फुलावी वेल नात्यांचीजणू दवबिंदूच्या पात्यावर ...बीजे रुजावी ... आपुलकीचीगोड विश्वासाच्या नात्यावर …धरुनी कास सत्याचीनात्यात गोडवा असावा …स्मरूनी गोड आठवणीचेहराही खुलून दिसावा …धरलं तर राहतं जवळअन सोडलं तर सुटतं …नातं हे विश्वासाचंटिकवावं … तरच टिकतं ...जिव्हाळ्याच्या नात्यातप्रेम देई गंध नवा …छानशा सोज्वळ नात्यातसंग ...सार्थ विश्वास हवा …संग पाऊले टाकू पुढेघेउनी हात हाती …निर्मळ वृत्ती अंगिकारूअन … जपूया विश्वासाची नाती … !!
मन पाखरू उनाड...
कधी मला वाटतं स्वच्छंद पाखरू मी व्हावं,
पंख ते पसरुनी उंच गगनात झेपावं...
कुण्या गावच्या दूर नदीकाठी फिरावंअशा ठिकाणी जिथं कुणी कुणी नसावं...
कधी मला वाटे लहानसं लेकरू मी व्हावं,
घट्ट बिलगुनी आईच्या कुशीत मी निजावं...
कधी मला वाटे गायीचं वासरू मी व्हावं,
अपार ओढीने तिच्या अवतीभवती घुटमळावं...
कधी मला वाटे कवीचे काव्य सुंदर व्हावं
मनीच्या भावना वेचून छान शब्दात मला गुंफाव...
कधी मला वाटे नाविकाची नौका मी व्हावं,
वाऱ्याच्या दिशेने स्वतः बेफाम भिरकावं...मन माझं पाखरू उनाड, विहरते उंच आकाशीजगणं माझं धुंद स्वच्छंदी, गीत सजवून माझ्या सुरांशी ... !!
सदस्यता लें
संदेश (Atom)